कै. अविनाश जोशी स्मृतीप्रीत्यर्थ
दिनांक: ६ जुलै, २०२५ || स्थान: गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड, नाशिक
नाशिक परिसरातील तमाम ट्रेकर्स मंडळींनी पुढाकार घेऊन "सह्याद्री मित्र संमेलन नाशिक २०२५" आयोजित केले आहे. यंदा हे ३ रे वर्ष आहे. कै. जोशीकाकांच्या स्मृतींना उजाळा देणे व त्यानिमित्त विविध कार्यक्रम व पुरस्कार आयोजित करणे हा या संमेलनाचा मूळ उद्देश आहे. नाशिककरांबरोबरच महाराष्ट्रातील सह्याद्री प्रेमी, निसर्गप्रेमी, सायकलिस्ट व ट्रेकर मंडळी यांना सामावून घेण्याचं स्वप्न बघून आम्ही ह्या कार्यक्रमाच्या तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहोत. सह्याद्रीत भटकणा-यांसाठी आपलं स्वतःचं व्यासपीठ असावं. त्यावर आपल्या कलागुणांना सादर करण्याची संधी मिळावी आणि वर्षातून एकदा तरी आपण सर्व भटक्यांनी एकत्र यावं, भेटीगाठी व्हाव्यात आणि सह्याद्री जागर व्हावा. यासाठीचं… हे सह्याद्री मित्र संमेलन.
संवेेदनांचा, प्रेरणेचा आणि निसर्गभिमाचा उत्सव – एक सुंदर अध्यायाची सांगता...
दुपारी ४ वाजता सुरू झालेल्या या अर्धा दिवसाच्या संमेलनाची सुरुवात नाशिकच्या सिंहगर्जना ढोल पथकाने धुमधडाक्यात केली. प्रितम भामरे यांच्या अचाट ढोलवादनानंतर एक्सपालियर शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत गाऊन सभागृहातील सर्वांना भारावून टाकले.
अध्यक्ष रंगराव आण्णा पाटील, प्रमुख पाहुणे आनंद पाळंदे, जेष्ठ गिर्यारोहक श्रीमती उष : प्रभा पागे आणि सह्याद्री रत्न पुरस्कारार्थी श्री. हरिश कपाडिया सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
कै. अविनाश जोशी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित या संमेलनात त्यांच्या जीवनावर आधारित फिल्म दाखविण्यात आली. श्री. हरिश कपाडिया सरांच्या सह्याद्री भटकंतीवरील भाषणाने संमेलन संपले आणि सर्व उपस्थित सह्याद्री प्रेमी आनंदाचे भाव घेऊन परतले.